पाचव्या, सहाव्या वेतन आयोगातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

महागाईभत्त्यात ७ ते १२ टक्के वाढ जाहीर 


नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) सहावा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात सात टक्के वाढ जाहीर केली आहे. हे असे कर्मचारी आहेत, जे सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेस म्हणजेच सीपीएसईमध्ये काम करतात आणि त्यांचे वेतन केंद्रीय महागाईभत्ता (सीडीए पॅटर्न) नुसार केले जाते. त्याचबरोबर पाचवा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये १२% वाढ करण्यात आली आहे.


अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांच्या मते, कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ पासून आतापर्यंत देण्यात येत असलेला महागाईभत्ता १८९% इतका आहे.


आता तो १८९% वरून १९६% एवढा होणार आहे. हे दर सीडीए कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू आहेत, ज्यांचे वेतन डीपीई (सार्वजनिक उपक्रम विभाग) कार्यालयाच्या मेमोरँडमनुसार बदलले गेले आहे.


महागाईभत्त्याची रक्कम राऊंड फिगरमध्ये घेतली जाईल. भारत सरकारच्या विभागांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी हे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.



महागाईभत्ता १२ टक्क्यांनी वाढला


केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाईभत्ता ३५६% वरून ३६८% पर्यंत वाढवण्यात आला आहे. हे असे कर्मचारी आहेत, जे पाचव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार पूर्व-सुधारित वेतनश्रेणी/ग्रेड वेतनामध्ये आपला पगार घेत आहेत.



पाचवा वेतन आयोग असलेल्यांना लाभ


महागाईभत्ता एक्स्पर्ट हरिशंकर तिवारी म्हणाले की, या वाढीचा लाभ पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल, ज्यांनी मूळ वेतनात ५०% डीए विलीन करण्याचा लाभ घेतला नाही. या सीपीएसई कर्मचाऱ्यांना देय असलेला डीए सध्याच्या ४०६% वरून ४१८% टक्के करण्यात आला आहे. ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू होण्याची शक्यता आहे. हरिशंकर तिवारी यांच्या मते, केंद्र सरकारच्या अखत्यारीत अशा अनेक सीपीएसई आहेत, जिथे वेतनश्रेणी वेगळी आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे