Naresh Mhaske : नरेश म्हस्के मागच्या दरवाजाने राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल!

म्हणाले, 'चर्चा तर होणारच!'; नेमकं काय आहे भेटीमागचं कारण?


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे नुकतेच लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर आज त्यांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मात्र, या भेटीसाठी ते मागच्या दाराने शिवतीर्थावर (Shivtirtha) दाखल झाले, त्यामुळे या भेटीची विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, यावर नरेश म्हस्के यांनी भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो', असं ते यावेळी म्हणाले.


नरेश म्हस्के म्हणाले, 'राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या कार्यालयाला आणि घराला भेट दिली होती. ठाणे व कल्याण लोकसभेसाठी त्यांनी महायुतीसाठी सभा देखील घेतली होती. राजसाहेबांचं मार्गदर्शन काय माझ्या पाठीशी असतं. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरु केलं तेव्हासुद्धा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यामुळे आयुष्यात खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणं मला क्रमप्राप्त ठरतं', असं म्हस्के म्हणाले.


विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनितीबाबत विचारले असता म्हस्के म्हणाले, 'विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत. मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं बदलली आहेत, काही लोक विशिष्ट समाजाचं दृष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये, काही समाजांमध्ये, काही धर्मांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, ते कशा पद्धतीने आपण लोकांसमोर मांडायला पाहिजे, तसंच त्यांचा जो खरा चेहरा आहे तो लोकांसमोर उघडा पाडायचाय, त्या दृष्टीने रणनिती आम्ही आखली आहे'. याच बाबतीत राज ठाकरेंशी चर्चा झाली का असं विचारलं असता, 'चर्चा तर होणारच' असं सूचक विधान नरेश म्हस्के यांनी केलं.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र