Tuesday, July 2, 2024
Homeक्रीडाIND vs PAK: भारताने पाकिस्तानच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास, रोमहर्षक सामन्यात...

IND vs PAK: भारताने पाकिस्तानच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास, रोमहर्षक सामन्यात ६ धावांनी विजय

न्यूयॉर्क: न्यूयॉर्कच्या नसाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय गोलंदाजांनी जादुई कामगिरी करताना टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध ६ धावांनी विजय मिळवून दिला. टॉस हरवल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित ब्रिगेडला केवळ ११९ धावा करता आल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची धावसंख्या एक काळ १३व्या षटकापर्यंत २ बाद ७३ इतकी होती. यावेळी पाकिस्तान सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी बाजी परतून लावली. १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला केवळ ११३ धावाच करता आल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने ३ आणि हार्दिक पांड्याने २ विकेट मिळवल्या.

सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. बुमराहने ४ षटकांत १३ धावा देत तीन विकेट मिळवल्या. तर हार्दिक पांड्याने फखर जमां आणि शादाब खान यांना बाद करत कमबॅक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंह आणि अक्षऱ पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळवलाय अर्शदीपने सामन्याती शेवटची ओव्हर टाकली होती. यात पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या.

याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात चांगली झाली नव्हती. दुसऱ्याच षटकांत विराट कोहलीची विकेट गमावली होती. कोहली ४ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर रोहित आफ्रिदीच्या बॉलवर आऊट झाला. यानंतर अक्षर पटेल आणि पंतने तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची सर्वाधिक भागीदारी केली. मात्र पटेल मोठा शॉट मारण्याच्या नादात बोल्ड झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -