मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्री म्हटले जाते. चाणक्य यांच्या निती शास्त्रात जीवनातील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयींमुळे त्याच्याकडे धन आगमन होत नाही. यामुळेच या सवयी लवकरात लवकर बंद करणे योग्य असते.
चाणक्य म्हणतात की सकाळी उठून विशेष कार्य करणाऱ्या लोकांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.
चाणक्य म्हणतात की आपल्याला नेहमी ब्रम्ह मुहूर्तावर उठले पाहिजे. यावेळेस उठून स्नान आणि ध्यान केले पाहिजे. यामुळे यश आणि सुख-समृद्धीचे रस्ते उघडतील.
जर तुम्ही काही मोठे कार्य कऱणार असाल तर सकाळी लवकर उठून त्याची योजना आणि रणनीती बनवा. तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही.
आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतो. लक्षात ठेवा की आपली इन्कम पाहून खर्च केला पाहिजे.
आपल्या इनकममधील किती भाग भविष्यासाठी राखून ठेवला पाहिजे याचा हिशेब जरूर ठेवा. व्यापाऱ्यांसाठी तर ही मोठी गोष्ट आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते दररोज सूर्यदेवाला जल अर्पित केले पाहिजे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनात प्रगती होते.