Sonakshi Sinha : हिरामंडीच्या यशानंतर सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात!

बॉयफ्रेंड जहीरसोबत 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'हिरामंडी' (Heeramandi) या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजमधील तिची दुहेरी भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. यानंतर सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्नगाठ बांधणार आहे. या सोहळ्याला काही निवडक व जवळच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं असून यात 'हिरामंडी'च्या टीमची विशेष उपस्थिती असणार आहे.


सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांचे एकत्र अनेक फोटोज, व्हिडीओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोनाक्षी जहीरसोबत येत्या २३ जूनला लग्नबंधनात अडकू शकते. मात्र, अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



कशी आणि कुठे झाली जहीर आणि सोनाक्षीची भेट?


जहीर आणि सोनाक्षीच्या भेटीसोबत सलमान खानचं (Salman Khan) एक खास नातं आहे. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात ती सलमान खानसोबत झळकली होती. तर जहीर इक्बाल हा सलमानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी यांचा मुलगा असून त्याला सलमाननेच आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'नोटबुक' या फिल्ममधून लाँच केलं. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. जहीरआधी सोनाक्षी अर्जुन कपूरला डेट करत होती. आता चाहत्यांना जहीर आणि सोनाक्षी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य