न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलावले. मात्र पाकिस्तानचा हा डाव यशस्वी ठरला.
पाकिस्तानने असा भेदक मारा केला की भारताचा डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. भारताकडून विकेटकीपर ऋषभ पंतने ४२ धावा करत निकराचा लढा दिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. पंतपाठोपाठ अक्षरने २० धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने १२ धावा केल्या. भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत.
पाकिस्तानच्या नसीम शाहने आणि हरिस रौफने जबरदस्त गोलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना एकामागोएक बाद केले. त्यांनी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावा हव्या आहेत.