कधी वणवा
पेटतो उभ्या देहात
तर कधी वादळे
थैमान चालतात…
कधी निश्चल,
निपचित देह मरणासन्न…
कधी दिशाहीन चित्त
कधी असंवेदनशील मन…
तारेवरची कसरत
स्थिर स्थावर होण्यासाठी…
तोल ढळताना दिसतोय…
हळव्या मनाचा
का? कधी? कोणासाठी?
आणि कशासाठी?
तळमळतोय हा जीव…?
अनेक प्रश्नांचा
भडीमार सतत…
निरुत्तर राहतात
सारेच प्रश्न…
घुसमट वाढते
मनाची अधिकच…
अन् मन हलकं..
करण्यासाठी
शोधते ती
किती विश्वासाने
विश्वासाचं नातं…
कधी हवा असतो
विसावण्यासाठी
खांद्याचा आधार …
अनुभवायची असते…
साथ आपलेपणाची…
वाट्याला येतं एकाकीपण…
ती चालत राहते
स्वतःच स्वतःचा
शोध घेण्यासाठी…
दुरदूर क्षितिजा पार…
सापडत नाही
कधीच तिलाही ती…
शोध अपूर्णच राहतो…
अगदी तुझ्या माझ्या
कहानी सारखा…
समईतील ती शुभ्र वात
पसरूनी धुक्याची दुलई
पर्वा ना शुभ्र तमाची
मनी तेवते तव आठवणींची समई..
मन समईची वात मंद तेवते
त्यात मी पण जळते
मन सोने उजळता
मन सावळेची होते..
नयनातील काजळी
उगीच मना दुखविते
कोठूनी तो झरोका
आशा-किरण दाखविते…
दाखविते वाट
मनाच्या अंधारात
अंतरंग ते माझे
उगीच मंद हासते..
त्या किरणातूनी आशा
मजकडे पाहते
निराशलेले मन माझे
क्षणभरी आनंदते…
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…