Rishi Saxena : ‘काहे दिया परदेस’मुळे ‘मल्हार’ चित्रपट मिळाला

Share

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

हिंदी भाषिक असूनदेखील मराठी मनोरंजन क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारा अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. त्याचा ‘मल्हार’ चित्रपट नुकताच हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे. ऋषी मूळचा राजस्थानचा, जोधपूरमधील सेंट पॉल शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. शालेय जीवनात त्याला डान्स आवडायचा. राजस्थान युनिव्हर्सिटीमधून त्याने बी. कॉम. केले. त्यावेळी तो क्रिकेट खेळायचा. केवळ क्रिकेट खेळायचा व अभ्यास करायचा. सी. एस. त्याने अर्धवट केलं. त्याला मॉडेलिंग आवडायला लागले. मुंबईमध्ये जाऊन मॉडेलिंग करायला त्याने सुरुवात केली. चार महिन्यांत त्याला मॉडेलिंगचा कंटाळा आला. तो परत राजस्थानला गेला. त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्याने अभिनय करण्याचा निर्णय केला.

मुंबईला आल्यावर त्याने नीरज कबीर यांच्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला. तिथे अभिनयाचे बाळकडू घेतले. ‘यहाँ बंदे सस्ते मिलते है’ या नाटकात त्याने काम केले. हे नाटक पाहून झाल्यावर वडिलांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. त्यानंतर त्याने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. अभिनयाच्या क्षेत्रात त्याचा संघर्ष सुरू होता. त्याच वेळी त्याच्या जीवनाने टर्निंग पॉइंट घेतला. त्याला ‘काहे दिया परदेस’ ही मालिका मिळाली. यामधील त्याची शिव नावाची व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय ठरली होती. त्यामध्ये सायली संजीव, मोहन जोशी, शुभांगी गोखले यांच्याकडून भरपूर गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या. कॅमेऱ्या समोर अभिनय कसा करायचा, हे तो या मालिकेपासून शिकला. त्यानंतर त्याने कलर्स वाहिनीसाठी ‘सलीम अनारकली’ मालिका केली. परंतु ती लवकर बंद झाली. पुढे काय करायचं, हे त्याच्या मनात निश्चित नव्हते, त्याचवेळी त्याला ‘फत्तेशिकस्त’, ‘सुभेदार’ हे चित्रपट मिळाले.

‘काहे दिया परदेस’ मालिकेतील काम पाहून, दिग्दर्शकाने त्याला ‘मल्हार’ या चित्रपटाची ऑफर दिली. आता त्याचा ‘मल्हार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये त्याने लक्ष्मण नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तो शांत प्रवृत्तीचा असतो. त्याच्या घरामध्ये घडामोडी होत असतात, परंतु तो काहीच बोलत नसतो. वेळप्रसंगी त्याला टीकेला देखील सामोरे जावे लागले. त्याच्या पत्नीसोबत काही घडत असते, परंतु हा मात्र शांत असतो. तो सरपंचाचा मुलगा असतो. त्याच्या पत्नीला मुल होत नसतं. तिच्याशी त्याच पटत नाही. शेवटी त्यांच्या नात्यातील दुरावा कसा नष्ट होतो, हे सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी त्याची भूमिकेविषयी खूप चर्चा झाली. त्यानंतर त्याने त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला. या चित्रपटाकडून त्याला भरपूर अपेक्षा आहेत. त्याची एक मराठी वेबसीरिज, रेनबो चित्रपट, संसारा चित्रपट येणार आहे. ऋषीला मल्हार चित्रपटासाठी व त्याच्या आगामी वेबसीरिज व चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!

Recent Posts

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

45 minutes ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

59 minutes ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

1 hour ago

Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!

निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…

2 hours ago

Pune News : स्मार्ट पुण्यात बनावट कपड्यांचा सुळसुळाट!

पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…

2 hours ago

Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…

2 hours ago