Mumbai Potholes : मुंबईकरांचा पावसाळ्यात होणार खड्डेमुक्त प्रवास!

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दावा


मुंबई : मान्सून तोंडावर येताच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) अनेक उपाययोजना सुरू करण्यात येतात. अनधिकृत होर्डिंग, दरड कोसळणे, धोकादायक इमारतींची पाहणी, रस्त्यांवरील खड्डे अशा सर्व कामांचे नियोजन करण्यात येतं. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा दावा केला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांसाठी खड्डेमुक्त (Mumbai Potholes) रस्ते करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दरवर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना होतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळ्यातील खड्ड्यांचा २४ तासात निपटारा करावा असे निर्देश दिले आहेत. त्यासोबत यावेळी पावसाळ्यात मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरिकांना होणारा खड्ड्यांचा त्रास लवकरच कमी होईल असा पालिकेने दावा केला आहे.



मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत


पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल, असे पालिकेने सांगितले. तसेच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखण्यात येणार आहे. त्याचबरोबर खड्डा भरताना योग्य आकारात भरला जाईल या गोष्टीचीही पालिका दक्षता घेणार आहे, असे सहआयुक्त अभिजीत बांगर यांनी म्हटले.



जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करावी


प्रत्येक विभागात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यासाठी २ मास्टिक कुकर आणि ९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांसाठी १ मास्टिक कुकर याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकरचा वापर करावा. तसेच सर्व विभागातील मास्टिक कुकर हे सुस्थितीत आणि वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खात्री विभागीय पातळीवर करण्यात यावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला लवकरात लवकर जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या