Mumbai Potholes : मुंबईकरांचा पावसाळ्यात होणार खड्डेमुक्त प्रवास!

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दावा


मुंबई : मान्सून तोंडावर येताच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) अनेक उपाययोजना सुरू करण्यात येतात. अनधिकृत होर्डिंग, दरड कोसळणे, धोकादायक इमारतींची पाहणी, रस्त्यांवरील खड्डे अशा सर्व कामांचे नियोजन करण्यात येतं. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा दावा केला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांसाठी खड्डेमुक्त (Mumbai Potholes) रस्ते करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दरवर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना होतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळ्यातील खड्ड्यांचा २४ तासात निपटारा करावा असे निर्देश दिले आहेत. त्यासोबत यावेळी पावसाळ्यात मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरिकांना होणारा खड्ड्यांचा त्रास लवकरच कमी होईल असा पालिकेने दावा केला आहे.



मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत


पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल, असे पालिकेने सांगितले. तसेच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखण्यात येणार आहे. त्याचबरोबर खड्डा भरताना योग्य आकारात भरला जाईल या गोष्टीचीही पालिका दक्षता घेणार आहे, असे सहआयुक्त अभिजीत बांगर यांनी म्हटले.



जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करावी


प्रत्येक विभागात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यासाठी २ मास्टिक कुकर आणि ९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांसाठी १ मास्टिक कुकर याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकरचा वापर करावा. तसेच सर्व विभागातील मास्टिक कुकर हे सुस्थितीत आणि वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खात्री विभागीय पातळीवर करण्यात यावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला लवकरात लवकर जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला