Bird Flu : धोक्याची घंटा! कोरोनानंतर जगभरात बर्ड फ्लूचे थैमान

WHOकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन


मुंबई : जगभरात कोरोनाच्या (Corona Virus) महामारीनंतर पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या थैमानानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) बर्ड फ्लू (Bird Flu) प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे सांगितले आहे. काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील दोघांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. वेळेत केलेल्या उपचारामुळे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एका परदेशी महिलेला बर्ड फ्लूने ग्रासले असून तिचा बळी गेला आहे. या घटनेमुळे जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली असून नागरिकांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, डब्लूएचओने बर्ड फ्लू प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी केली आहे. मेक्सिकोमधील एका ५९ वर्षीय महिलेमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत होती. ती तीन आठवडे अंथरुणाला खिळलेली होती. गंभीर लक्षणांमध्ये ग्रस्त असलेल्या आजारपणात या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेचा कोणत्याही पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांशी संपर्क आला नव्हता. तरीही तिच्यामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यामुळे याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले.



माणसांमध्ये संक्रमण शक्य आहे का?


बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांच्या संपर्कातून माणसांमध्ये प्रवेश करु शकतो. माणसांमध्ये या विषाणूच्या संक्रमणामुळे होणारा जास्तीत जास्त मृत्यूदर हा ६० टक्के इतका आहे. आणि याची क्षमता कोरोना व्हायरसपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे हे चिंतेचे कारण बनले आहे. सध्या या फ्लूचे माणसांकडून माणसांकडे संक्रमण होण्याबाबत कसलीही उदाहरणे आढळली नाहीत. मात्र ज्या व्यक्तीचा पक्ष्यांशी संपर्क आहे त्यांनाच हा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.



मानवामध्ये बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे


डोळा लाल होणे, ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे किंवा भरलेले नाक, स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी, थकवा, श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार, मळमळ, उलट्या होणे ही मुख्य लक्षणे दिसून येतात.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे