ठाणे : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ठाणे व कल्याणची जागा बालेकिल्ला समजली जाते व या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांनी आपली आघाडी कायम राखली आहे.
ठाण्यातून नरेश म्हस्के १९ हजार मतांनी पुढे आहेत. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ६ जागांवर आपली आघाडी टिकवून आहे.