Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना दणका!

२० मे रोजी घेतलेली 'ती' पत्रकार परिषद ठाकरेंना चांगलीच भोवणार!


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) दिले आहेत. त्यामुळे उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election result) जाहीर होण्याच्या वेळीच उद्धव ठाकरेंवर मात्र संकट येणार असल्याची चिन्हे आहेत. मुंबईतील मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० मे रोजी उद्धव ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद या सगळ्यासाठी कारणीभूत ठरली आहे. यातील उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेप घेत तक्रार नोंदवली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत.


उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मतदानात जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला होता. मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. पण निवडणूक यंत्रणा कमी पडली. ज्या जागांवर भाजपा व महायुतीला हरण्याची भीती आहे, अशा ठिकाणी मतदारांचा खोळंबा केला गेला, त्यामुळे कंटाळून मतदार निघून गेले, असंही ते म्हणाले होते. तसेच मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.


आचारसंहिता लागू असताना एखाद्या पक्षाविरोधी वक्तव्य करणं हा आचारसंहितेचा भंग असतो. त्यामुळे आशिष शेलार यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहितेचं उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेतली गेली आहे.


उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात त्यादिवशी पत्रकार परिषदेत नेमके काय झाले? याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर केला आणि तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत सापडणार आहेत.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील