समूहाचे गाणे – कविता आणि काव्यकोडी

Share

वर्गावर आल्या एकदा
आमच्या मुळेबाई
समूहदर्शक शब्द म्हण
शिकूया आज काही

मेथी, पालक, शेपूची
असते म्हणे जुडी
आंबे पिकवण्यासाठी
आंब्यांची अढी

गच्च बांधून ठेवतात
जशी उसांची मोळी
डोंगराळ रानात दिसे
करवंदांची जाळी

टोपलीत रचून ठेवतात
भाकरींची चवड
घराच्या कोपऱ्यात दिसे
मडक्यांची उतरंड

लुकलुक करून हसे
तारकांचा पुंज
झाडाला वेढून बसे
वेलींचा कुंज

जमिनीवर फुलून येई
फुलांचा ताटवा
आकाशी विहरत राही
पाखरांचा थवा

जंगलात फिरताना दिसे
हत्तींचा कळप
एकावर एक ठेवतात
नाण्यांची चळत

कवितेतून समूहाचा
बोध कळून आला
समूहदर्शक शब्दांचा
अभ्यास छान झाला!

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) हुडहुडी भरते
दात लागे वाजू
मऊ मऊ दुलईत
खूप वेळ निजू

दव आणि धुक्याचे
दान हे पडते
कोणत्या ऋतूत
ही किमया घडते?

२) महिन्यानुसार हा
बदलतो पाने
दिवसाचे रोज
गातो नवे गाणे

ऑफिस, घर, शाळा
कुठेही भटकतो
बारामास भिंतीवर
कोण बरं लटकतो?

३) सुरुवातीला होता
रंग याचा काळा
खडूशी नेहमीच
दोस्ती याची बाळा

वेडवाकडं लिहिल्यावर
वाईट हा दिसतो
शिकवताना मदतीला
कोण बरं असतो?

उत्तर –

१) हिवाळा

२) दिनदर्शिका

३) फळा

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

1 hour ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago