T20 WC:उद्यापासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप, २९ दिवस खेळवले जाणार ५५सामने

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेची सुरूवात १ जून म्हणजेच उद्यापासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना डलासमध्ये हा सामना रंगणार आहे. अमेरिकेच्या वेळेतील बदलामुळे भारतात टी-२० वर्ल्डकपची सुरूवात २ जूनपासून होणार आहे.


स्पर्धेच्या नॉकआऊटसह एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. २९ दिवस हे सामने रंगणार आहेत. टीम इंडिया आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनपासून करत आहेत.


ग्रुप ए मध्ये टीम इंडियाचा समावेश आहे. टीम इंडिया चार लीगचे सर्व सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. तर काही संघ ग्रुप लीगचे सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांच्या मनात स्पर्धेच्या टायमिंगबाबत सवाल आहेत.



काय आहेत टीम इंडियाच्या सामन्यांची वेळ


भारतीय चाहत्यांच्या मनात टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेबाबत संभ्रम आहे. भारतीय संघाचे सर्व लीग सामने अमेरिकेत होत आहेत. सुरूवातीचे तीन सामने न्यूयॉर्क तर शेवटचा लीग सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणारे सामने लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेनऊ वाजता होतील. भारतीय वेळेनुसार या तीन सामन्यांची सुरूवात रात्री ८ वाजल्यापासून सुरू होतील. तर फ्लोरिडामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या शेवटच्या लीगमधील लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेदहा वाजता आहे. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना