T20 WC:उद्यापासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप, २९ दिवस खेळवले जाणार ५५सामने

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेची सुरूवात १ जून म्हणजेच उद्यापासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना डलासमध्ये हा सामना रंगणार आहे. अमेरिकेच्या वेळेतील बदलामुळे भारतात टी-२० वर्ल्डकपची सुरूवात २ जूनपासून होणार आहे.


स्पर्धेच्या नॉकआऊटसह एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. २९ दिवस हे सामने रंगणार आहेत. टीम इंडिया आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनपासून करत आहेत.


ग्रुप ए मध्ये टीम इंडियाचा समावेश आहे. टीम इंडिया चार लीगचे सर्व सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. तर काही संघ ग्रुप लीगचे सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांच्या मनात स्पर्धेच्या टायमिंगबाबत सवाल आहेत.



काय आहेत टीम इंडियाच्या सामन्यांची वेळ


भारतीय चाहत्यांच्या मनात टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेबाबत संभ्रम आहे. भारतीय संघाचे सर्व लीग सामने अमेरिकेत होत आहेत. सुरूवातीचे तीन सामने न्यूयॉर्क तर शेवटचा लीग सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणारे सामने लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेनऊ वाजता होतील. भारतीय वेळेनुसार या तीन सामन्यांची सुरूवात रात्री ८ वाजल्यापासून सुरू होतील. तर फ्लोरिडामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या शेवटच्या लीगमधील लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेदहा वाजता आहे. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

Comments
Add Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने