Mumbai Traffic : मुंबईकरांची दुहेरी कोंडी! एकीकडे मेगाब्लॉक दुसरीकडे ट्रॅफिकजाम

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक (Megablock) जारी केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे नागरिक एसटी, बस अशा इतर पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. प्रवाशांचा खोळंबा झाल्याने हैराण आहेत, अशातच त्यांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मेगाब्लॉक दरम्यान एसटी महामंडळाने विशेष बस सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र मुलंड (Mulund) ऐरोली मार्गावर ट्रेलर घसरल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची दुहेरी कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलंड ऐरोली मार्गावर ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडून ऐरोलीला येणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. त्यामुळे मार्गावर गाड्यांच्या दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. या ट्रेलरला बाजूला करण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पण ट्रेलर बाजूला केल्यानंतर सुद्धा वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर मेगाब्लॉक असल्यामुळे अनेकजण स्वतःच्या खासगी वाहनाने बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आज दिवसभर राहणार आहे.


दरम्यान, मध्य रेल्वेवर करण्यात आलेला मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे सध्या हाल होताना पाहायला मिळत आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे या कोंडीमधून बाहेर कसे पडावे असा प्रश्न सर्व प्रवाशांसमोर पडला आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र