Mumbai Traffic : मुंबईकरांची दुहेरी कोंडी! एकीकडे मेगाब्लॉक दुसरीकडे ट्रॅफिकजाम

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक (Megablock) जारी केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे नागरिक एसटी, बस अशा इतर पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. प्रवाशांचा खोळंबा झाल्याने हैराण आहेत, अशातच त्यांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मेगाब्लॉक दरम्यान एसटी महामंडळाने विशेष बस सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र मुलंड (Mulund) ऐरोली मार्गावर ट्रेलर घसरल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची दुहेरी कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलंड ऐरोली मार्गावर ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडून ऐरोलीला येणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. त्यामुळे मार्गावर गाड्यांच्या दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. या ट्रेलरला बाजूला करण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पण ट्रेलर बाजूला केल्यानंतर सुद्धा वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर मेगाब्लॉक असल्यामुळे अनेकजण स्वतःच्या खासगी वाहनाने बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आज दिवसभर राहणार आहे.


दरम्यान, मध्य रेल्वेवर करण्यात आलेला मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे सध्या हाल होताना पाहायला मिळत आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे या कोंडीमधून बाहेर कसे पडावे असा प्रश्न सर्व प्रवाशांसमोर पडला आहे.

Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी