बाहेर गेलेल्या कंपन्या कोणाच्या काळात गेल्या : आ. नितेश राणे

Share

उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगण्याचे आवाहन

शिर्डी : उद्धव ठाकरेंनी आपल्या दोन्ही मुलांचा डोक्यावर हात ठेवून सांगावे की या कंपन्या आताच बाहेर गेल्या आहे की कोरोना काळात गेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्याही कंपन्या बाहेर गेल्या आहेत, त्यांना परत आणण्याचे काम आमचे महायुतीचे सरकार करत आहे. उद्धव ठाकरे खोटारडा माणूस असल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते नितेश राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

भाजपाचे नेते आ. नितेश राणे यांनी परिवारासह शुक्रवारी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साईसमाधीवर त्यांनी शाल चढवली. यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी म्हटले की, ४ जुन रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. निकाला आधी साईबाबांच्या दर्शनासाठी सहपरिवार आलो आहे. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व्हावे, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात कंपन्या बाहेर गेल्या. उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत असेल तर लंडनमधून परत येवू द्यायचे का? याबद्दल महाराष्ट्रातील जनता विचार करेल. लंडनमध्ये बसुन महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत असेल तर लंडनमध्येच ठाकरेंना पॅकअप करायला पाहिजे असल्याची टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

भाजपा प्रवेशासाठी अनेकांची नावे

विजय वडेट्टीवार ज्या ठिकाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तेथे आमचे लोक प्रतिनिधी निवडून येतात. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी चार जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. महाविकास आघाडीत फूट पडलेली आहे. ती फक्त बाहेर येण्याचे बाकी आहे, महाविकास आघाडीतून कोण कोण बाहेर पडणार हे चार जूननंतर समोर येईल. आम्हाला निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या ज्या लोकांनी आतून मदत केली आहे. हे सगळेजण चार जूननंतर भाजपामध्ये प्रवेश करतांना दिसतील. यामध्ये विजय वडेट्टीवार यांचेही नाव असल्याचे मी ऐकतोय, असेही यावेळी राणे म्हणाले.

जाणूनबुजुन अपमान करण्याचे कृत्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हे कृत्य भाजपच्या नेत्यांकडून घडले असते तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धींगाणा घातला असता. जितेंद्र आव्हाडने माफीपर्यंत न थांबता आपल्या हातात काय असते, आपण काय फाडतोय याची जाणीव सर्वांनाच असते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा तर कधी औरंगजेबाचे उदात्तीकरण, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान, मग म्हणायचे की डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आहे, असे उच्चार करण्याची मग तुमची हिमत कशी होते ? अपमान करण्याचे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी जाणून बुजून केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Recent Posts

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

55 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

1 hour ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

2 hours ago