Nashik Water Crisis : नाशिककरांवर दुष्काळ! नागरिकांना भोगावी लागतेय पाण्याची चणचण

महिन्यातून केवळ एकाच दिवशी होतोय पाणीपुरवठा


नाशिक : नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीबाणीच्या (Water Shortage) तीव्र संकटांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यासह (Marathwada) नाशिकमध्येही (Nashik) पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शहरातील काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.



मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा


पाणीटंचाईचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडकरांना याही वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ २० ते २२ दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे.



पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई


पेठ तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून ८५ कामे सुरू आहेत. त्यामधील ७७ कामे ही निर्धारित मुदत संपूनही पूर्ण झाली नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर वाड्या -वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याचे आगमन होईपर्यंत नाशिककरांना तीव्र पाणीटंचाईच्या समस्या पार कराव्या लागत आहेत. नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी जलजीवन योजनेच्या माध्यमातून काम सुरु केले आहे. मात्र मुदत संपूनही ते काम पूर्ण झालं नसल्यामुळे जलजीवन योजनेचे पाणी मुरते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत