Nashik Water Crisis : नाशिककरांवर दुष्काळ! नागरिकांना भोगावी लागतेय पाण्याची चणचण

  59

महिन्यातून केवळ एकाच दिवशी होतोय पाणीपुरवठा


नाशिक : नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीबाणीच्या (Water Shortage) तीव्र संकटांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यासह (Marathwada) नाशिकमध्येही (Nashik) पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शहरातील काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.



मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा


पाणीटंचाईचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडकरांना याही वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ २० ते २२ दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे.



पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई


पेठ तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून ८५ कामे सुरू आहेत. त्यामधील ७७ कामे ही निर्धारित मुदत संपूनही पूर्ण झाली नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर वाड्या -वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याचे आगमन होईपर्यंत नाशिककरांना तीव्र पाणीटंचाईच्या समस्या पार कराव्या लागत आहेत. नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी जलजीवन योजनेच्या माध्यमातून काम सुरु केले आहे. मात्र मुदत संपूनही ते काम पूर्ण झालं नसल्यामुळे जलजीवन योजनेचे पाणी मुरते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित