Nashik Water Crisis : नाशिककरांवर दुष्काळ! नागरिकांना भोगावी लागतेय पाण्याची चणचण

महिन्यातून केवळ एकाच दिवशी होतोय पाणीपुरवठा


नाशिक : नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीबाणीच्या (Water Shortage) तीव्र संकटांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यासह (Marathwada) नाशिकमध्येही (Nashik) पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शहरातील काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.



मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा


पाणीटंचाईचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडकरांना याही वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ २० ते २२ दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे.



पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई


पेठ तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून ८५ कामे सुरू आहेत. त्यामधील ७७ कामे ही निर्धारित मुदत संपूनही पूर्ण झाली नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर वाड्या -वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याचे आगमन होईपर्यंत नाशिककरांना तीव्र पाणीटंचाईच्या समस्या पार कराव्या लागत आहेत. नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी जलजीवन योजनेच्या माध्यमातून काम सुरु केले आहे. मात्र मुदत संपूनही ते काम पूर्ण झालं नसल्यामुळे जलजीवन योजनेचे पाणी मुरते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.

Comments
Add Comment

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान

मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...

मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र,

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या