जम्मू : जम्मूच्या अखनूरमधून एका भीषण रस्ते अपघाताची (Jammu Accident) माहिती समोर आली आहे. जम्मू-पुच्छ महामार्गावरील अखनूर येथील तांडा वळणावर एक बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूला जात होती. या बसमधून सुमारे ५० ते ६० जण प्रवास करत होते.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्यसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूतील शिव खोडी येथे जात होती. त्यावेळी बस अखनूर येथील तांडा या वळणार आली असताना खोल दरीत कोसळली.
दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोकांचा आरडाओरडा सुरू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना अखनूर रुग्णालयात आणि जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…