Dharavi Fire : धारावीत अग्नितांडव! भीषण आगीत ६ जण जखमी

  73

आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट


मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) येथे पहाटेच्या सुमारास एका गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. या परिसरातील कमर्शियल गारमेंट, जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. ही आग जमिनीपासून गोदामाच्या वरील तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे.


घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच दहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाकडून सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना आगीतून बाहेर काढून उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलं आहेत. दरम्यान, सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे. मात्र आग लागण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसल्याचं अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सावंत यांनी सांगितले.



जखमींची माहिती


आगीत जखमी झालेले सलमान खान (२६) अणि मनोज (२६) ८ ते १० टक्के भाजले आहेत. सैदुल रहमान (२६) हे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. तर रफिक अहमद (२६), सल्लाउद्दीन(४०) व सैदुल रहमान (२६) हे ४० ते ५० टक्के भाजले आहेत. दरम्यान, जखमींवर उपचार सुरु असून सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही