Dharavi Fire : धारावीत अग्नितांडव! भीषण आगीत ६ जण जखमी

आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट


मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) येथे पहाटेच्या सुमारास एका गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. या परिसरातील कमर्शियल गारमेंट, जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. ही आग जमिनीपासून गोदामाच्या वरील तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे.


घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच दहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाकडून सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना आगीतून बाहेर काढून उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलं आहेत. दरम्यान, सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे. मात्र आग लागण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसल्याचं अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सावंत यांनी सांगितले.



जखमींची माहिती


आगीत जखमी झालेले सलमान खान (२६) अणि मनोज (२६) ८ ते १० टक्के भाजले आहेत. सैदुल रहमान (२६) हे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. तर रफिक अहमद (२६), सल्लाउद्दीन(४०) व सैदुल रहमान (२६) हे ४० ते ५० टक्के भाजले आहेत. दरम्यान, जखमींवर उपचार सुरु असून सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम