Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीदेशातील उष्णतेची लाट ओसरणार : महापात्रा

देशातील उष्णतेची लाट ओसरणार : महापात्रा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट सुरू आहे. लोक उष्णतेमुळे हैरान झाले होते. परंतु येत्या ३ दिवसात देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट ओसरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ‘नैऋत्य मान्सून, २०२४ च्या पल्ल्याचा दुसरा टप्पा’ या विषयावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट पुढील तीन दिवसानंतर हळूहळू कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वायव्य भारत आणि देशाच्या मध्यभागी उष्णतेच्या लाटेपासून तीन दिवसांनंतर आराम मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतातील बहुतांशी राज्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत.

दरम्यान पुढील तीन दिवसांनंतर दिल्ली, राजस्थान, हरियाणा या वायव्य आणि मध्य भागांमध्ये उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार आहे. गुरुवारपासून (दि.३० मे) उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात होईल, असेही आयएमडी प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा यांनी म्हटले आहे.

यंदा संपूर्ण देशात पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दि.२७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर ईशान्य प्रदेशात मंगळवार २८ मे पर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असे देखील भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -