Friday, January 23, 2026

Skin Care Tips: आंघोळीनंतर लगेचच चेहऱ्यावर लावा ही गोष्ट, मॉश्चरायजरची गरज नाही

Skin Care Tips: आंघोळीनंतर लगेचच चेहऱ्यावर लावा ही गोष्ट, मॉश्चरायजरची गरज नाही

मुंबई: तुम्हालाही चेहरा विनाडाग आणि सुंदर हवा आहे. तर दररोज आंघोळीनंतर कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. यामुळे अनेक फायदे होतात.

चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या गराचा वापर करू शकता. प्रत्येकाला सुंदर दिसावेसे वाटते. अशातच तुम्ही आंघोळीनंतर या गोष्टीचा वापर करू शकता. कोरफडीचा गर तुम्हाला हायड्रेट करण्यास मदत करते.

कोरफडीच्या गरामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटामिन असतात. जे त्वचेला निरोगी ठेवतात. आंघोळीनंतर चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा आणि सुकू द्या.

सकाळी आंघोळीनंतर चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने चेहऱ्यावर डाग, धब्बे दूर होतात. यामुळे डेड स्किन दूर होते आणि त्वचेवरील अॅलर्जी दूर होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा