शब्दवीण संवादू…

Share

हलकं-फुलकं – राजश्री वटे

निशब्द क्रिया…
‘ मी कशी शब्दात सांगू
भावना माझ्या तुला…
तू… तुझ्या समजून घे…

किती सुंदर शब्दांकित केले आहे, हे गाणे… न बोलताही भावपूर्ण ओळी आहेत!
खरंच आयुष्यात किती तरी प्रसंग असे येतात… तिथे शब्दांची गरज नसते, शब्दांची जागा डोळ्यातील भाव किंवा नुसत्या स्पर्शाने समजली जाते! डोळे खूप काही सांगून जातात… न बोलता खूप काही समजूनही जातात… स्पर्शही बोलून जातो… तिथे कधी कधी संवादाची गरजही नसते!
राग, प्रेम, समजावणं, धीर देणं, आधार देणं… असे सगळे भाव डोळ्यात दिसतात न बोलताही!
निशब्द संवाद…
डोळ्यांचा…
स्पर्शाचा…
मनाने भावना व्यक्त होतात,
जेव्हा शब्द माघार घेतात…
नजर व स्पर्शाने पोहोचता येतं मनापर्यंत!
पलकों के पिछे से क्या कह डाला…. फिर से तो फरमाना….
पापण्याआडून व्यक्त झालेलं प्रेम!
भावनांची शब्दांमध्ये देवाणघेवाण करण्याचे वरदान फक्त मानवालाच प्राप्त झालं आहे!

सुख-दुःखात… कधी नजरेतून… तर कधी स्पर्शातून एकमेकांना समजून घेता येतं, स्पर्शामध्ये अनेक अर्थ सामावले असतात… स्पर्श लाजरे असतात… बुजरे असतात… मायेने ओथंबलेले असतात… तर कधी आक्रमक ही असतात… स्पर्श बोलके होतात, तेव्हा त्या त्या वेळचे अर्थ कळत जातात…

स्पर्श रेशमी असतात… जाडे भरडे असतात… बोचरे असतात… आश्वासक ही असतात… स्पर्श जपले पाहिजेत!
अशाच भावना डोळ्यांतही वेळप्रसंगी बघायला मिळतात, फक्त त्या वाचता आल्या पाहिजेत!
‘आपला माणूस’ या सिनेमात नाना पाटेकरच्या मुलाला करडा सवाल….’ शेवटचा स्पर्श कधी केला होतास रे… म्हाताऱ्याला?’

शहारून टाकतो हा प्रश्न…
लहान बाळाला जसा स्पर्श केल्याने, ते आश्वासक होतं… तसेच म्हाताऱ्या जीवाचंही असतं… कुठल्याही वयात स्पर्शाचं महत्त्व वेगळं असतं, धीर देणारं असतं! पाठीवरचा स्पर्श… मी पाठीशी आहे सांगतो!

वडिलांच्या नजरेत प्रेमळ धाक तर स्पर्शात आधार असतो! आईच्या नजरेत ममता तर स्पर्शात दिलासा असतो!
जरा नजरों से कह दो जी…
कधी गर्दीत, कधी एकले पणात शब्द ही मौन पाळतात व्यक्त होण्याआधी! मग डोळे अन् स्पर्श असतात, संवाद साधण्यासाठी!

‘छुकर मेरे मन को किया तुने क्या इशारा…’
फक्त समजायला पाहिजे…
अर्थपूर्ण निशब्द संवाद!

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago