Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा मराठवाडा दौरा; घेणार दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा!

  102

उपायोजना आखण्यासाठी आचारसंहिता शिथील करण्याची निवडणूक आयोगाकडे केली विनंती


छ्त्रपती संभाजीनगर : एकीकडे निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे तर दुसरीकडे उन्हाच्या लाटांनी महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र पुन्हा महाराष्ट्रात उकाड्याने चांगलाच पेट घेतला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेच आहेत त्यासोबत प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.


अशातच सध्या मराठवाड्यात (Marathwada) दुष्काळाची परिस्थिती आणखी भीषण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दुष्काळासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याचसोबत या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, पालकमंत्री, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.



'असा' घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढवा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. याबाबत तत्काळ मदत कशी आणि कोणती करावी याचंही नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या चाऱ्याचा पुरवठा कसा करावा, या संदर्भातदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.



आचारसंहिता शिथील करण्याची मागणी


आगामी काळात ही स्थिती जास्तच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ मदत आणि उपायोजनांची गरज आहे. मात्र निवडणुकीमुळे राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशा स्थितीत मराठवाड्यासह इतर दुष्काळसदृश भागांना मदत करताना अडचणी येत आहेत. राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेता त्यांना मदत करण्यासाठी, उपायोजना आखण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.


दरम्यान राज्य सरकारच्या या विनंतीवर निवडणूक आयोग विचार करत आहे. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत