Crime : धक्कादायक! अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थीनीने उचलले 'हे' खडतर पाऊल!

निकाल लागताच ती किचनमध्ये गेली...दरवाजा लावला...अन्...


मुंबई : काल ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल हाती लागला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून अनेक जण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र, काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण न मिळाल्याने व नापास झाल्यामुळे ते हताश झाले. अशातच भाईंदर येथून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भाईंदर पूर्व येथील एका बारावीच्या विद्यार्थिनीला अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने कठोर पाऊल उचललं आहे. या घटनेने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षांची ही मुलगी मालाडच्या एका खासगी महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होती. काल बारावीचा निकाल लागला तेव्हा विद्यार्थिनी थोडी निराश झाली होती. कारण विद्यार्थीनीला ९० टक्के मिळावे अशी अपेक्षा होती मात्र तिला ७८ टक्के मिळाले होते. त्यामुळे या विद्यार्थीनीने मंगळवारी दुपारी किचनमध्ये असलेल्या नायलॉनच्या रश्शीने गळफास घेत आत्महत्या केली.



नेमकं घडलं काय?


बारावीतील या विद्यार्थीनीचा स्वभाव खूप लाघवी होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला बारावीत ९० टक्के मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तिला ७८ टक्के मिळाले होते. त्यामुळे ती निराश होती. परीक्षेनंतरही ती थोडी शांतच होती. यासंबंधी तिच्या कुटुंबियांनी चर्चादेखील केली होती. त्यांनी तिला समजावले होते आणि चिंता न करण्याबद्दलही समजावले होते. मात्र निकाल लागताच घरच्यांच्या नकळत ती किचनमध्ये गेली आणि दरवाजा बंद करुन घेतला. नंतर काही वेळातच एका व्यक्तीने किचनमध्ये तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्याने आरडाओरडा करुन परिसरातील नागरिकांना गोळा केले. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला आणि इमारतीतील नागरिकांना या घटनेबद्दल कळले.


दरम्यान, या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुनं दिली प्रेमाची कबुली, तुझ्या प्रेमात वेडी झालीये म्हणत केली 'ही' पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिंकू राजगूरू ही सोशल मिडियावर सक्रिय असून

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे सेक्रेड गेम्स,मँटो आणि ब्लॅक वॉरंट यांसारख्या

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या

प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस