Sanjay Dutt : 'वेलकम ३'चा भाग नसणार संजय दत्त! केवळ एका दिवसाचं शूटिंग केलं आणि...

  71

संजयने का केलं बॅकआऊट?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle) म्हणजेच वेलकम चित्रपटाच्या तिसर्‍या भागाची चर्चा आहे. अक्षय कुमार (Askhay Kumar), दिशा पटानी, रवीना टंडन, श्रेयस तळपदे असे अनेक तगडे कलाकार या निमित्ताने सिनेमात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. त्यातच सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) असल्याचे कळल्याने चाहते खूश झाले होते. मात्र, संजयबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केवळ एक दिवस या सिनेमाचं शूटिंग केल्यानंतर त्याने या सिनेमातून बॅकआऊट केलं आहे. याचं कारणही आता समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे संजय दत्तने हा निर्णय घेतला आहे. संजय दत्तने मुंबईतील मड आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटाला रामराम ठोकला. 'वेलकम टू द जंगल' हा लोकप्रिय 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. संजयच्या व्यक्तिरेखेची चित्रपटात खूप ॲक्शन होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या प्रकृतीचा विचार करत चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.


२०२३ मध्ये या चित्रपटाची संपूर्ण कलाकारांसह घोषणा करण्यात आली. अक्षय सोबत या चित्रपटात दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, लारा दत्ता, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांचा समावेश आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.