Sanjay Dutt : 'वेलकम ३'चा भाग नसणार संजय दत्त! केवळ एका दिवसाचं शूटिंग केलं आणि...

संजयने का केलं बॅकआऊट?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle) म्हणजेच वेलकम चित्रपटाच्या तिसर्‍या भागाची चर्चा आहे. अक्षय कुमार (Askhay Kumar), दिशा पटानी, रवीना टंडन, श्रेयस तळपदे असे अनेक तगडे कलाकार या निमित्ताने सिनेमात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. त्यातच सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) असल्याचे कळल्याने चाहते खूश झाले होते. मात्र, संजयबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केवळ एक दिवस या सिनेमाचं शूटिंग केल्यानंतर त्याने या सिनेमातून बॅकआऊट केलं आहे. याचं कारणही आता समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे संजय दत्तने हा निर्णय घेतला आहे. संजय दत्तने मुंबईतील मड आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटाला रामराम ठोकला. 'वेलकम टू द जंगल' हा लोकप्रिय 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. संजयच्या व्यक्तिरेखेची चित्रपटात खूप ॲक्शन होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या प्रकृतीचा विचार करत चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.


२०२३ मध्ये या चित्रपटाची संपूर्ण कलाकारांसह घोषणा करण्यात आली. अक्षय सोबत या चित्रपटात दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, लारा दत्ता, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांचा समावेश आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर

Navi Mumbai : सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा; अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना मारहाण

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा मुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा