मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरच्या ५८ आणि वेंकटेश अय्यरच्या ५१ धावांच्या जोरावर आयपीएल २०२४च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने हैदराबादला ८ विकेट राखून हरवले.
आयपीएल २०२४च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने हे आव्हान १३.४ षटकांत आणि ८ विकेट राखत पूर्ण केले. यासोबतच केकेआरने फायनलमध्ये प्रवेश केा आहे.
कोलकातासाठी मिचेल स्टार्कने ३ विकेट मिळवल्या. तर फलंदाजीत वेंकटेश अय्यरने २८ बॉलमध्ये नाबाद ५१ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने २४ बॉलमध्ये नाबाद ५८ धावांची मॅचविनिंग खेळी केली. आता सनरायजर्स हैदराबाद २४ मेला दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.
यानंतर आता २२ मेला एलिमिनिटेर सामना खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. यांच्यातील विजेत्या संघाशी आता २४ मेला सनरायजर्स हैदराबादचा सामना होणार आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…