मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

  129

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीने राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचे दिसून आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असतानाच या गोंधळाची राज्याचे मुख्य सचिव यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


सोमवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी गोंधळाच्या परिस्थिती मतदान पार पडले. मुंबईतील बहुतेक ठिकाणी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक ठिकाणी मोठा घोळ झाल्याचे चित्र होते. मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला तर, मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता. सोमवारी मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदान केंद्रांवर ज्या ठिकाणी गैरसोय होती, मतदानाला विलंब लागत होता,या सर्व बाबींची होणार चौकशी करण्यात येणार आहे. मुख्य सचिवांनी तातडीने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)