मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीने राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचे दिसून आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असतानाच या गोंधळाची राज्याचे मुख्य सचिव यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सोमवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी गोंधळाच्या परिस्थिती मतदान पार पडले. मुंबईतील बहुतेक ठिकाणी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक ठिकाणी मोठा घोळ झाल्याचे चित्र होते. मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला तर, मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता. सोमवारी मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदान केंद्रांवर ज्या ठिकाणी गैरसोय होती, मतदानाला विलंब लागत होता,या सर्व बाबींची होणार चौकशी करण्यात येणार आहे. मुख्य सचिवांनी तातडीने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…