Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

  87

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील १४ जागा आणि महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान सुरू झाले आहे.या टप्प्यात राजनाथ सिंह, स्मृती इराणी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींसह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नशीबाचा फैसला होणार आहे.


राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यात एकूण मिळून १३ जागांवर मतदान होत आहे. आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या मतदारसंघात मतदान होत आहे.



पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार


राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अभिनेता भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल किर्तीकर, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे यांच्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार आपल्या मतधिकाराचा वापर करतील. एकूण ९४३७२ मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. यावेळी ९.४७ लाख मतदान अधिकारी ही मतप्रक्रिया पार पडतील.



अक्षय कुमार, अनिल अंबानी यांनी केले मतदान


भारताची नागरिकता मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी विकसित आणि मजबूत भारत हवा आहे. त्यासाठी मतदान केल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अनिल अंबानी यांनी रांगेत जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला.

 
Comments
Add Comment

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट