Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील १४ जागा आणि महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान सुरू झाले आहे.या टप्प्यात राजनाथ सिंह, स्मृती इराणी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींसह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नशीबाचा फैसला होणार आहे.


राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यात एकूण मिळून १३ जागांवर मतदान होत आहे. आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या मतदारसंघात मतदान होत आहे.



पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार


राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अभिनेता भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल किर्तीकर, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे यांच्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार आपल्या मतधिकाराचा वापर करतील. एकूण ९४३७२ मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. यावेळी ९.४७ लाख मतदान अधिकारी ही मतप्रक्रिया पार पडतील.



अक्षय कुमार, अनिल अंबानी यांनी केले मतदान


भारताची नागरिकता मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी विकसित आणि मजबूत भारत हवा आहे. त्यासाठी मतदान केल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अनिल अंबानी यांनी रांगेत जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला.

 
Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने