Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील १४ जागा आणि महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान सुरू झाले आहे.या टप्प्यात राजनाथ सिंह, स्मृती इराणी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींसह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नशीबाचा फैसला होणार आहे.


राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यात एकूण मिळून १३ जागांवर मतदान होत आहे. आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या मतदारसंघात मतदान होत आहे.



पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार


राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अभिनेता भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल किर्तीकर, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे यांच्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार आपल्या मतधिकाराचा वापर करतील. एकूण ९४३७२ मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. यावेळी ९.४७ लाख मतदान अधिकारी ही मतप्रक्रिया पार पडतील.



अक्षय कुमार, अनिल अंबानी यांनी केले मतदान


भारताची नागरिकता मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी विकसित आणि मजबूत भारत हवा आहे. त्यासाठी मतदान केल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अनिल अंबानी यांनी रांगेत जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला.

 
Comments
Add Comment

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या

लैंगिक छळाच्या आरोपाखाली फरार असलेल्या स्वामी चैतन्यांनदला आग्रा येथून अटक

नवी दिल्ली: दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला

विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ३९ लोकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी, मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केली मदत

करूर, तामिळनाडू: प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या रॅलीत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. करूरमध्ये आयोजित