फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गदारोळ झाला. अचानक जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त जाहीर सभा होणार होती. राहुल-अखिलेश येताच कार्यकर्ते अचानक अनियंत्रित झाले आणि स्टेजवर पोहोचले. हा गोंधळ इतका प्रचंड होता की दोन्ही नेते भाषण न करता तेथून निघून गेले. या गोंधळात अनेक जण जखमीही झाले आहेत. या गोंधळाचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या पोलीस या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी रांचीमध्येही इंडिया आघाडीच्या सभेत गदारोळ झाला होता.
अलाहाबादमध्ये काँग्रेस, तर फुलपूरमध्ये सपाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोघांच्या समर्थनार्थ ही संयुक्त रॅली काढण्यात येणार होती.
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…
वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…
परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…
DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…