लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश!


मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देखील मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.


मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे अनेक अपघात होता. यात खांबाला धडकून, खाली पडून होणा-या अपघातांची संख्या देखिल वाढली आहे. त्यामुळे कोर्टाने यावर चिंता व्यक्त केली आहे.


आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. शुक्रवारी ही घटना घटली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.


दुस-या घटनेत उल्हासनगर येथे राहणा-या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय ५५) यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते.


तिस-या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ८.४५ च्या सुमारास घडली.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही