लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश!


मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देखील मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.


मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे अनेक अपघात होता. यात खांबाला धडकून, खाली पडून होणा-या अपघातांची संख्या देखिल वाढली आहे. त्यामुळे कोर्टाने यावर चिंता व्यक्त केली आहे.


आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. शुक्रवारी ही घटना घटली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.


दुस-या घटनेत उल्हासनगर येथे राहणा-या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय ५५) यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते.


तिस-या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ८.४५ च्या सुमारास घडली.

Comments
Add Comment

मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील अपघात स्थळाला महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, आमदार मिहिर कोटेचा यांची भेट

उपासनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांचे केले सांत्वन मुंबई : मुलुंड (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अँड

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड,

Mulund Metro Slab Collapse: "दोषींवर कडक कारवाई केली जाईल"; मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवर महापौर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

मुलुंड: मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधेरीतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी