लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

  57

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश!


मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देखील मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.


मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे अनेक अपघात होता. यात खांबाला धडकून, खाली पडून होणा-या अपघातांची संख्या देखिल वाढली आहे. त्यामुळे कोर्टाने यावर चिंता व्यक्त केली आहे.


आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. शुक्रवारी ही घटना घटली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.


दुस-या घटनेत उल्हासनगर येथे राहणा-या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय ५५) यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते.


तिस-या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ८.४५ च्या सुमारास घडली.

Comments
Add Comment

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात