Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीलोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश!

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देखील मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे अनेक अपघात होता. यात खांबाला धडकून, खाली पडून होणा-या अपघातांची संख्या देखिल वाढली आहे. त्यामुळे कोर्टाने यावर चिंता व्यक्त केली आहे.

आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. शुक्रवारी ही घटना घटली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.

दुस-या घटनेत उल्हासनगर येथे राहणा-या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय ५५) यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते.

तिस-या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ८.४५ च्या सुमारास घडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -