उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

Share
  • आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या
  • मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले
  • आता बोटाच्या शाईवरून निराधार आरोप करणे हा चक्क पळपुटेपणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) राज्यातील चार टप्पे पार पडले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडून काही मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील काही मतदारसंघात मतदारांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते, असा आरोप केला. त्या आरोपाला आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंसारखा निवडणुकीला घाबरणारा दुसरा डरपोक माणूस मी पाहिला नाही. आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या. ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. तो विषय संपत नाही, तोच ज्या भागात निवडणुका झाल्या आहेत, तिथल्या मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले. आता बोटाच्या शाईवरून आरोप करायला लागले. आपला निवडणुकीतला पराभव स्पष्ट दिसत असल्याने उद्धव ठाकरे निराधार विधानं करत आहेत. निराधार आरोप करणे हा पळपुटेपणा आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

शिवसैनिकांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचं काय करायचं हे मी सत्ता आल्यावर बघुन घेईन, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, बघुन घेईन म्हणजे काय? उद्धव ठाकरेंना ही दडपशाहीची भाषा शोभत नाही. उद्धव ठाकरेंची भाषा म्हणजे, चोर मचाये शोर, अशी टीका शेलारांनी केली.

मोदीजी उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील. आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. त्याविषयी विचारले असता शेलार म्हणाले की, मला वाटते की, उद्धव ठाकरे नुसते भ्रम पसरण्याचे काम करत आहे. आम्ही सगळ्या संस्था वैचारिक दृष्ट्या एक आहोत. मात्र आमची कार्यपद्धती वेगळी आहे. आमचे रुप विश्वरूप दर्शनासारखे आहे. त्यामुळे काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा खोचक टोला शेलारांनी लगावला.

Recent Posts

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

9 mins ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

2 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

2 hours ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

3 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

4 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

4 hours ago