IPL 2024: विराट कोहलीचा रेकॉर्ड, क्रिस गेलशी केली बरोबरी

मुंबई: विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरोधात आयपीएल सामन्यात रेकॉर्ड्सची बरसात केली आहे. विराट कोहलीचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. त्याने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ३ हजाराहून अधिक धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एखाद्या सिंगल ठिकाणी ही कामगिरी करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने २९ बॉलमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. ३५ वर्षीय कोहलीने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा ७००चा आकडा पार केला.


विराट कोहली आयपीएल २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने या हंगामात १५५.६०च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने या दरम्यान ५९ चौकार आणि ३७ षटकार ठोकले आहेत.


आयपीएलमध्ये एका हंगामात २ वेळा ७०० हून अधिक स्कोर करणारा कोहली पहिला भारतीय ठरला. या बाबतीत त्याने क्रिस गेलशी बरोबरी केली. गेलनेही आयपीएलमध्ये २ वेळा ७०० प्लस स्कोर केला आहे. कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. विराटने याआधी २०१६ आयपीएलमध्ये ४ शतकांच्या मदतीने सर्वाधिक ९७३ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि