Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

  156

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१४ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १९६ धावाच करता आल्या. मुंबईने एका हंगामात सर्वाधिक सामन्यात पराभव मिळवण्याच्या आपल्याच रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. मुंबईला आयपीएल २०२४मध्ये १० पराभवाचा सामना करावा लागला आहे.


याआधी २०२२मध्येही मुंबईने १० पराभवांचा सामना केला आहे.मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर राहिला. ते या हंगामात १४ सामने खेळले या दरम्यान केवळ त्यांना ४ सामन्यात विजय मिळवता आला. तर १० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने सुरूवातीला तीन सामन्यात सलग पराभव पाहिला. त्यांना गुजरात, हैदराबाद आणि राजस्थानने हरवले. त्यानंतर दिल्ली, लखनऊ आणि कोलकातानेही हरवले.


मुंबईला २००९मध्ये ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर २०१४ आणि २०१८मध्ये ८-८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२२च्या हंगामात मुंबईने १० सामने गमावले होते आणि आता २०२४मध्ये संघाने १० सामने गमावले आहेत.


मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला. तर ४ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या मैदानांवर केवळ १ सामना जिंकला आणि ६मध्ये पराभव स्वीकारला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार