भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी!

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील, तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवितात आणि मग उत्तमरीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते, तसेच भगवंतावर श्रद्धा ठेवावी. नेहमी आपले वर्तन चांगले ठेवावे.


असा नियम आहे की, ज्या भक्ताचे भगवंतावर प्रेम आहे, तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की, तोही भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे, ते ज्याला लाभेल, तो भाग्याचा खरा! एक भगवंताचे प्रेम लागले की, वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की, ती आपोआप कळू लागते.


एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर, पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे, भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला, जसे प्रथम औषध घ्यावे, त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी.


ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे, त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील. पण या सर्व साधनांमध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे.


ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भक्त भगवंताच्या भक्तीत तल्ली झाला की, त्याच्याआड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल, त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभसाध्य आहे. जो हिनाहून हीन आणि अडाण्यांतला अडाणी आहे, त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे.


तात्पर्य : ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे, हाच एक मार्ग आहे.

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,