Sangali Loksabha : विश्वासात न घेता सांगलीच्या जागेबाबत घाई!

विश्वजित कदम यांचा सांगलीच्या राजकारणावरुन काँग्रेसवर आरोप


मुंबई : 'सांगलीच्या जागेबाबत घाई करण्यात आली. आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. आम्ही सांगलीचे वाघ आहोत, हे एका रात्रीत हे विधान आले नाही. सांगली जिल्ह्यात आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत. जनतेच्या सुखदुखात सहभागी होत आहोत. सांगली जिल्ह्यातील भावना मांडणे माझे काम होते. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सांगलीच्या जागेसाठी लढले. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आले आहेत. या परिस्थितीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला', असे सांगत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केले.


आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गेल्या २ वर्षापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली, त्यात ती यात्रा महाराष्ट्रात आली, तेव्हा ३२५ किमी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात २ नेते चालले. मी नांदेड ते बुलढाणा पायी चाललो. त्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? कर्नाटकातील निवडणूक असेल, तिथे काँग्रेसचे सिद्धरामैय्या विजयी झाले. ते सांगलीत आले, तेव्हा त्यांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम सांगली शहरात आयोजित केला होता. एक काळ मी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे. महाराष्ट्रात वैचारिक राजकारण होत होते, परंतु व्यक्तिगत लढाई नव्हती. परंतु आज विरोधी पक्षातील आमदाराशी जाहीरपणे बोलले तरी हा भाजपात चाललाय, हा शिवसेनेत चाललाय, हा राष्ट्रवादीत चाललाय अशी चर्चा होते. याचा अर्थ राजकारणात व्यक्तिगत संबंध असूच नये का? असं सांगत त्यांनी भाजपा प्रवेशावर स्पष्टीकरण दिले.


तसेच मविआतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले होते. शाहू महाराजांना कुठल्या पक्षात लढायचे, हे त्यांनी ठरवले. त्याठिकाणी शाहू महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचे ठरवले. त्यामुळे कोल्हापूरचा आणि सांगलीचा संबंध नव्हता. हातकणंगले जर ठाकरेंना मिळाली तर सांगली कशासाठी? हे आमचे म्हणणे होते. ३ मे रोजी कोल्हापुरात उद्धव ठाकरे आले, तेव्हा निवडणुकीची वस्तुस्थिती, सांगलीची परिस्थिती यावर व्यक्तिगत चर्चा केली. २ महिन्याचा कालावधी हा उत्सुकतेचा, संघर्षाचा आणि काही प्रमाणात निराशेचा होता. एखाद्या नेतृत्वाला जी गोष्ट हवी असते, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यानंतर अचानक एखादा निर्णय होतो, त्यानंतर काय भावना असते, या सर्व गोष्टीतून मी २ महिन्यात गेलो आहे असेही विश्वजित कदमांनी सांगितले.


दरम्यान, काँग्रेसचे संघटन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकर्ते सापडतील. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांच्या बाबतीत या वयात जे घडले त्याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. महाराष्ट्राची जनता विचार करून मतदान करते, असे विश्वजित कदमांनी म्हटले.



खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवे येणार नाही


विशाल पाटील आणि माझी जोडी तुटलीय हे कुणी सांगितले? सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीपर्यंत इच्छा होती, मी लोकसभेची निवडणूक लढवावी. परंतु माझ्या मतदारसंघातील लोकांना मला सोडायचं नव्हते अशी माझी भावना होती. उद्धव ठाकरेंबाबत व्यक्तिश: प्रचंड आदर आहे. बाळासाहेबांचा वारसा ते चालवतायेत, संघर्षातून त्यांना वाटचाल करावी लागतेय. परंतु सांगलीच्या बाबतीत निर्णय घेण्यास घाई झाली. मी विशालला शब्द दिला होता. खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवे येणार नाही, जरी पक्षश्रेष्ठींनी सांगितले तरी मी माझ्या पातळीवर ते अडवण्याचा प्रयत्न करेन, असा खुलासाही विश्वजित कदम यांनी केला.

Comments
Add Comment

Pune News: पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय

Pune Crime: गुटख्याच्या पुडीवरून मामाचा संताप; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील चिखली (Chikhali) परिसरात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. गुटखा आणला नाही

Sakshaym Tate Murder Case : त्याने माझ्यासोबत नको ते.....; सक्षम ताटेच्या प्रकरणात वेगळे वळण

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) गेल्या वर्षी घडलेल्या सक्षम ताटे (Sakshaym Tate Murder Case) ऑनर किलिंग प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

Mumbai-Pune Bullet Train : मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! देशात 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर उभारण्याची तयारी

भारतीय रेल्वे (Indian Railway) देशातील दळणवळण व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी 7 प्रमुख हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर

Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली; 12 जिल्ह्यांना उष्णतेचा तर 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Pune Water Cut : पुणेकरांना मोठा झटका! आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; धरणसाठा घटल्याने महापालिकेचा कडक निर्णय

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने आणि धरणांतील पाणीसाठा