Sangali Loksabha : विश्वासात न घेता सांगलीच्या जागेबाबत घाई!

विश्वजित कदम यांचा सांगलीच्या राजकारणावरुन काँग्रेसवर आरोप


मुंबई : 'सांगलीच्या जागेबाबत घाई करण्यात आली. आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. आम्ही सांगलीचे वाघ आहोत, हे एका रात्रीत हे विधान आले नाही. सांगली जिल्ह्यात आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत. जनतेच्या सुखदुखात सहभागी होत आहोत. सांगली जिल्ह्यातील भावना मांडणे माझे काम होते. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सांगलीच्या जागेसाठी लढले. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आले आहेत. या परिस्थितीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला', असे सांगत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केले.


आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गेल्या २ वर्षापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली, त्यात ती यात्रा महाराष्ट्रात आली, तेव्हा ३२५ किमी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात २ नेते चालले. मी नांदेड ते बुलढाणा पायी चाललो. त्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? कर्नाटकातील निवडणूक असेल, तिथे काँग्रेसचे सिद्धरामैय्या विजयी झाले. ते सांगलीत आले, तेव्हा त्यांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम सांगली शहरात आयोजित केला होता. एक काळ मी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे. महाराष्ट्रात वैचारिक राजकारण होत होते, परंतु व्यक्तिगत लढाई नव्हती. परंतु आज विरोधी पक्षातील आमदाराशी जाहीरपणे बोलले तरी हा भाजपात चाललाय, हा शिवसेनेत चाललाय, हा राष्ट्रवादीत चाललाय अशी चर्चा होते. याचा अर्थ राजकारणात व्यक्तिगत संबंध असूच नये का? असं सांगत त्यांनी भाजपा प्रवेशावर स्पष्टीकरण दिले.


तसेच मविआतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले होते. शाहू महाराजांना कुठल्या पक्षात लढायचे, हे त्यांनी ठरवले. त्याठिकाणी शाहू महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचे ठरवले. त्यामुळे कोल्हापूरचा आणि सांगलीचा संबंध नव्हता. हातकणंगले जर ठाकरेंना मिळाली तर सांगली कशासाठी? हे आमचे म्हणणे होते. ३ मे रोजी कोल्हापुरात उद्धव ठाकरे आले, तेव्हा निवडणुकीची वस्तुस्थिती, सांगलीची परिस्थिती यावर व्यक्तिगत चर्चा केली. २ महिन्याचा कालावधी हा उत्सुकतेचा, संघर्षाचा आणि काही प्रमाणात निराशेचा होता. एखाद्या नेतृत्वाला जी गोष्ट हवी असते, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यानंतर अचानक एखादा निर्णय होतो, त्यानंतर काय भावना असते, या सर्व गोष्टीतून मी २ महिन्यात गेलो आहे असेही विश्वजित कदमांनी सांगितले.


दरम्यान, काँग्रेसचे संघटन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकर्ते सापडतील. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांच्या बाबतीत या वयात जे घडले त्याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. महाराष्ट्राची जनता विचार करून मतदान करते, असे विश्वजित कदमांनी म्हटले.



खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवे येणार नाही


विशाल पाटील आणि माझी जोडी तुटलीय हे कुणी सांगितले? सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीपर्यंत इच्छा होती, मी लोकसभेची निवडणूक लढवावी. परंतु माझ्या मतदारसंघातील लोकांना मला सोडायचं नव्हते अशी माझी भावना होती. उद्धव ठाकरेंबाबत व्यक्तिश: प्रचंड आदर आहे. बाळासाहेबांचा वारसा ते चालवतायेत, संघर्षातून त्यांना वाटचाल करावी लागतेय. परंतु सांगलीच्या बाबतीत निर्णय घेण्यास घाई झाली. मी विशालला शब्द दिला होता. खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवे येणार नाही, जरी पक्षश्रेष्ठींनी सांगितले तरी मी माझ्या पातळीवर ते अडवण्याचा प्रयत्न करेन, असा खुलासाही विश्वजित कदम यांनी केला.

Comments
Add Comment

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.

Israel - Iran War : आखाती देशांतील महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या अत्यावश्यक सूचना

इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा

Thane: अभिनेत्री ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक; सेक्स रॅकेट प्रकरणात अटकेत

ठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Trimbakeshwar Temple Video: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

नाशिक: होळी, धुलिवंदनाच सण, सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची

सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटविश्वात पदार्पण, पुढे बॉलिवूड स्टार बनला; कोण आहे हा अभिनेता?

मुंबई: कपिल देव, इरफान पठाण, सुनील गावस्कर, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांच्यासह अनेक क्रिकेट स्टार्सनी बॉलिवूड

POSH Audit : महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये ३० दिवसांत 'पॉश ऑडिट करा नाहीतर...; महिला आयोगाचे आदेश

मुंबई: नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची