मुंबई : मुंबईमध्ये जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच मेट्रो- १ म्हणजेच वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर बॅनर कोसळल्याने ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद झाली आहे. ही ऑफिसेस सुटण्याची वेळ आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
जोरदार वादळाने एका राजकीय पक्षाचं बॅनर थेट मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर येऊन कोसळलं. त्यामुळे मेट्रो जागच्या जागीच थांबवावी लागली. त्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बॅनर हलवणे देखील कठीण होऊन बसले आहे. बॅनर काढण्यापूर्वी विजेचा पुरवठा पूर्णपणे खंडित करावा लागणार आहे. मात्र, अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्यामुळे अद्याप बॅनर काढण्यासाठी कोणीही पुढे सरसावलेलं नाही.
एअरपोर्ट स्टेशनला ही मेट्रो थांबवण्यात आली आहे. सर्व प्रवासी सुखरुप असून मेट्रो कधी सुरु होईल याची वाट पाहत आहेत. पहिल्याच पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल केल्याचे चित्र आहे.
दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अगदी तासाभरात मुंबईचे चित्र पालटले असून जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली आहेत. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…