Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai airport runway : वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळ रनवे बंद!

Mumbai airport runway : वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळ रनवे बंद!

अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवल्या

मुंबई : दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अगदी तासाभरात मुंबईचे चित्र पालटले असून जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, जोरदार ठिकठिकाणी झाडं कोसळली आहेत. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावासाचा फटका केवळ रस्ते वाहतुकीलाच बसत नसून विमानसेवेलाही बसला आहे. कारण दृश्यमानता कमी झाल्यामुळे मुंबई विमानतळ रनवे बंद करण्यात आला आहे.

वादळी वारा आणि पाऊस असल्यामुळे अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत. तासाभरात पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी परिणाम केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता मुंबई विमानतळ रनवे देखील काही काळ बंद केला आहे. काही वेळात तो सुरु होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -