Nitesh Rane : इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत!

काँग्रेस जिंकल्यास भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील


हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे


भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत आज ठाकरे गटाचंच मुखपत्र असलेल्या 'सामना' (Saamana) वर्तमानपत्रात छापून आली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी 'भाजपमुक्त राम पाहिजे' अशी टीका केली. यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि मविआवर (Mahavikas Aghadi) घणाघात केला आहे. 'इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, त्यामुळे विचार करुन मत द्या', असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.


नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लीम लीगची भाषा करणारे, मुस्लीम लीगची हिरवी पिल्लावळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे हे लोक आहेत. उद्या जर आपण इंडिया अलायन्सला आपण मत दिलं तर आपल्याला भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. जिथे आपण आज रामभक्त म्हणून दुकानाबाहेर किंवा घराबाहेर भगवे झेंडे फडकवतोय, त्याचीही परवानगी आपल्याला भारतामध्ये राहून मिळणार नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर काय झालंय ते पाहा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाच्या नावाने जसं सगळ्या सणासुदींवर बंदी घातली होती आणि दुसर्‍या बाजूला मोहरम आणि ईदच्या जोरदार मिरवणुका निघत होत्या तीच परिस्थिती उद्या इंडिया अलायन्स आणि मविआची लोकं निवडून आल्यानंतर भारतात होणार. तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा, तुमच्या घरातील मंदिराची पूजा करण्याची परवानगी तरी तुम्हाला देतील का इथपासून प्रश्न निर्माण होतील.


इंडिया अलायन्सच्या नावाने जे काही मतदान होतंय, जे काही फतवे निघतायत, ते धर्माच्या आधारे निघतायत, राष्ट्रभक्तांसाठी निघत नाही आहेत. संजय राजाराम राऊत हा कार्टा जे सकाळी बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी फतवे निघत आहेत, त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमान लोकांनी फक्त इंडिया आघाडी आणि मविआला मतदान करावं कारण 'हमारा धर्म खतरे में है', याला राष्ट्रभक्ती म्हणत नाहीत. म्हणून इंडिया आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, असं नितेश राणे म्हणाले.



हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे


ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले की राम मंदिर आम्हाला भाजपमुक्त करायचं आहे त्याप्रमाणे आम्हालाही हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे. कारण उद्धव ठाकरेची हिरवी टोळी जो हिंदू समाजाचा द्वेष करत आहे, त्या सगळ्याला नष्ट करण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि