Bihar News : अवकाळी पावसाचा कहर! बिहारमध्ये वीज पडून मृत्यू ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : एकीकडे कडकडत्या उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांवर तसेच अनेकांच्या जीवालाही बसत आहे. घोसियान, सूर्यपुरा, गंजभडसरा रोड, रोहतास अशा अनेक ठिकाणी वीज पडून काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच बिहारमध्येही वीज पडून चक्क पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


बिहारच्या रोहतास जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसामुळे बिक्रमगंज उपविभाग परिसरात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण भाजले आहेत. यापैकी एकाला उपचारासाठी उच्च रूग्णालयामध्ये पाठवण्यात आलं असून दोन जणांवर बिक्रमगंज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेजण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.


याशिवाय, घोसियान कला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ता बांधकामात मजूर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. तर सूर्यपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठगोठणी गावात खेळणाऱ्या आकाश किशोर नामक व्यक्तीचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे. दिनारा पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एक अशीच घटना घडली आहे. गंजभडसरा रोड कालव्यावर बेनसागर येथील विनय चौधरी यांचा मृत्यू झाला. रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज, सूर्यपुरा आणि दिनारा पोलीस स्टेशन परिसरात या घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात