Suresh Jain : ठाकरे गटाला दिलेल्या राजीनाम्यानंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा!

भाजपात होणार सामील?


जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत काल ठाकरे गटाला (Thackeray Group) पुन्हा एक मोठा धक्का मिळाला. ज्येष्ठ नेते सुरेश जैन (Suresh Jain) यांनी ठाकरे गटाला काल रामराम ठोकला. यानंतर ते थेट जळगावात दाखल झाले. मात्र, यानंतर कोणती भूमिका घेणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. मतदानासाठी आपण जळगावात (Jalgaon) दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर अखेर त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.


मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सुरेश जैन हे महायुतीला पाठिंबा देतील असे सूतोवाच केले होते. ते खरे ठरले असून विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीसोबत असल्याचे जैन यांनी सांगितले. याआधी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात सहभागी नसेन, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, मी सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहे. वयोमानानुसार आणि प्रकृती अस्वाथ्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. या पुढे जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी राहणार, मात्र कोणत्याही पक्षात मी सहभागी नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.


सुरेश जैन म्हणाले, महायुतीने असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही की जिथे त्यांच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत नाही. ते मला आवडत आहे आणि देशालाही त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी आणि हितासाठी ते काम करत असतील आणि या देशाला २०४७ पर्यंत तिसरी शक्ती बनवण्याचं स्वप्न बाळगत असतील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण देशाला म्हणजेच शेतकरी असो, आदिवासी असो वा स्त्रिया त्यांना सशक्त बनवण्याची त्यांची जी भूमिका आहे, ती मला आवडली म्हणून मी हा पाठिंबा देत आहे, असं सुरेश जैन म्हणाले. मात्र, मी कोणत्याही पक्षात नसेन, चांगल्या भूमिकेला माझा पाठिंबा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



कार्यकर्त्यांसाठी मी कुठलाही मेळावा घेणार नाही


कार्यकर्त्यांसंदर्भात प्रश्न विचारला असता सुरेश जैन म्हणाले, मी एकेका कार्यकर्त्याला बोलावून माझी भूमिका सांगणार नाही. मी मेळावा घेणार नाही किंवा प्रचारही करणार नाही. प्रेस नोट अथवा मीडियाच्या माध्यमातून जो विचार कार्यकर्त्यांपर्यंत जाईल तो जाईल, असं सुरेश जैन म्हणाले.

Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या

Government Job: राज्यात ७० हजार पदांची भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि