MP News : निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस थांबेना; नोटा इतक्या की पोलिसांना मोजताही येईना!

  77

मध्यप्रदेशमध्ये सापडला पैशांचा डोंगर


मध्य प्रदेश : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना या काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अशा निवडणुकींच्या काळात पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अथक प्रयत्न केले जातात. मात्र तरीही मोठ्या संख्येत पैशांचे व्यवहार होत असतानान दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच भांडूप, सायन, झारखंड परिसरात पोलिसांनी संशयित रक्कम जप्त केली होती. ते प्रकरण ज्वलंत असतानाच आता भोपाळमध्ये एका घरात पैशांचा ढिगारा सापडल्याची घटना समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या पंत नगर कॉलनीत कैलाश खत्री नावाच्या व्यक्तीच्या घरातून मोठ्या रोख स्वरूपात रक्कम जप्त करण्यात आली आहे. कैलाश खत्री याने मागील १८ वर्षांपासून मनी एक्स्चेंजचं काम करत असल्याचं कबूल केलं. त्याने पाच, दहा आणि वीस रुपयांच्या खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेत (Money Exchanger) आणि ग्राहकांना नवीन नोटा देत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. याबाबतची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून नोटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलिसांनाही त्या अजून मोजता आलेल्या नाहीत.


दरम्यान, पोलिसांनी नोटा जप्त केल्या असून त्या नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. अद्यापही युवकाकडे कोणते संशयास्पद दस्तऐवज सापडले नाहीत. त्याच्यावर अजून कारवाई सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही रक्कम १० लाखांपेक्षा जास्त असेल, तर दखल घेतली जाईल असं आयकर विभागाने सांगितलं आहे.


Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या