IPL: हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले. या विजयासह हैदराबादचे १४ अंक झाले आहेत तर पॉईंट्स टेबलमध्ये ते राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. हैदराबादने १६६ धावांचे आव्हान १०.२ षटकांत बिनबाद पूर्ण केले. हैदराबादचे १४ गुण झाले आहेत तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी १६ गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.


लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १४ मेला टक्कर होईल. यातील एका संघाचे कमीत कमी १३ गुण होतील. मुंबई इंडियन्स बाकी आपले दोन सामने जिंकून जास्तीत जास्त १२ गुण मिळवेल. मात्र टॉप ४ साठीही इतके गुण पुरेसे नाहीत.


मुंबई इंडियन्सची हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सुरूवात खराब राहिली. त्यांना सुरूवातीला सलग ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरच्या पुढील ४ सामन्यांपैकी ते तीन सामने जिंकले. मात्र त्यानंतर पुन्हा ४ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. यामुळे प्लेऑफमध्ये त्यांच्या खेळण्याच्या आशा मावळल्या आहेत.


मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट मिळवल्या. बुमराहने १२ सामन्यात १८ विकेट घेतल्या. यात इकॉनॉमी रेट ६.२० इतका होता. यानंतर मुंबईच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. त्यांच्या फलंदाजांची कामगिरी खराब राहिली. मुंबईचा एकही फलंदाज १२ डावांमध्ये ४००हून अधिक धावांचा आकडा पार करू शकला नाही. तिलक वर्माने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३८४ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ९ डावांत ३३४ धावा केल्या. रोहित शर्माने १२ डावांत ३३० धावा केल्या.

Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज