उच्च न्यायालयाच्या इमारतीचे तत्काळ सेफ्टी ऑडिट करा

  62

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी तातडीने सेफ्टी ऑडिट करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच गोरेगाव येथील भूखंड उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी सोयीस्कर नसल्याचे मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.


बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर आणि इतर वकिलांनी २९ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीबाबत पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटो याचिका दाखल करून घेतली या याचिकेवर मंगळवार दि. ७ मे रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.भूषण गवई आणि न्या. जे बी पारडीवाला यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.


त्यावेळी न्यायालयाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसाळ्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या इमारतीचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी अशा सूचना केल्या.


तसेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने सक्रिय व्हावे आणि नवीन इमारतीसाठी वांद्रे पूर्व येथे दिलेली जमीन तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाकडे सोपवावी, जेणेकरून नवीन उच्च न्यायालय संकुलाचे बांधकाम सुरू होईल. नवीन इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या जागेचे रेखाचित्र जलद काढण्यासही खंडपीठाने सरकारला सांगितले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता