Mobile: तुमच्या या चुकांमुळे मोबाईलची बॅटरी पटापट संपते

मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी आपण विविध पद्धती वापरतो. नवीन फोन घेतल्यावर त्याला नवीन कव्हर घातले जाते. त्याला स्क्रॅच येऊ नये यासाठी स्क्रीन गार्ड लावले जाते. मात्र जेव्हा फोन जुना होतो तेव्हा काही समस्या सतावू लागता. त्यापैकीच एक म्हणजे फोनची बॅटरी लवकर लवकर संपू लागते. मोबाईल फोनच्या चार्जिंगमध्ये समस्या येऊ लागतात.


एकतर मोबाईल फोन स्लो होतो अथवा बॅटरी लवकर लवकर संपू लागते. फोन जुना झाला की अनेकांना ही समस्या सतावत असते. मात्र असे नेहमीच काही होत नाही. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळेही फोनच्या बॅटरीमध्ये समस्या येऊ लागतात. तसेच बॅटरीही लवकर लवकर संपते.


उन्हाळ्याच्या दिवसांत फोन अधिक गरम होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहीत आहे का की चार्जिंगच्या वेळेस फोनचे कव्हर न काढल्यास बॅटरीतून निघणारी गरम हवा मोबाईलच्या कव्हरमुळे बाहेर पडू शकत नाही. बॅटरी गरम झाल्यास चार्जिंग थांबते आणि बॅटरीची टक्के वारी वाढण्याऐवजी कमी होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत कव्हर काढून चार्जिंग करण्याचा सल्ला दिला जातो.


अनेकदा लोक फोनची बॅटरी एकदम कमी झाल्यावरच चार्ज करतात. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की अखेर बॅटरी किती टक्के राहिल्यावर चार्ज करायला हवी. जर तुम्ही फोनची बॅटरी १०-१५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावरच चार्जिंगला लावत असाल तर यामुळे बॅटरीवर परिणाम होतो.


फोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नये. ही सवय कोणत्याही फोनसाठी चांगली नसते. फोनला अधिक चार्ज करणेही चांगले नसते. यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य