Mobile: तुमच्या या चुकांमुळे मोबाईलची बॅटरी पटापट संपते

मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी आपण विविध पद्धती वापरतो. नवीन फोन घेतल्यावर त्याला नवीन कव्हर घातले जाते. त्याला स्क्रॅच येऊ नये यासाठी स्क्रीन गार्ड लावले जाते. मात्र जेव्हा फोन जुना होतो तेव्हा काही समस्या सतावू लागता. त्यापैकीच एक म्हणजे फोनची बॅटरी लवकर लवकर संपू लागते. मोबाईल फोनच्या चार्जिंगमध्ये समस्या येऊ लागतात.


एकतर मोबाईल फोन स्लो होतो अथवा बॅटरी लवकर लवकर संपू लागते. फोन जुना झाला की अनेकांना ही समस्या सतावत असते. मात्र असे नेहमीच काही होत नाही. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळेही फोनच्या बॅटरीमध्ये समस्या येऊ लागतात. तसेच बॅटरीही लवकर लवकर संपते.


उन्हाळ्याच्या दिवसांत फोन अधिक गरम होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहीत आहे का की चार्जिंगच्या वेळेस फोनचे कव्हर न काढल्यास बॅटरीतून निघणारी गरम हवा मोबाईलच्या कव्हरमुळे बाहेर पडू शकत नाही. बॅटरी गरम झाल्यास चार्जिंग थांबते आणि बॅटरीची टक्के वारी वाढण्याऐवजी कमी होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत कव्हर काढून चार्जिंग करण्याचा सल्ला दिला जातो.


अनेकदा लोक फोनची बॅटरी एकदम कमी झाल्यावरच चार्ज करतात. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की अखेर बॅटरी किती टक्के राहिल्यावर चार्ज करायला हवी. जर तुम्ही फोनची बॅटरी १०-१५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावरच चार्जिंगला लावत असाल तर यामुळे बॅटरीवर परिणाम होतो.


फोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नये. ही सवय कोणत्याही फोनसाठी चांगली नसते. फोनला अधिक चार्ज करणेही चांगले नसते. यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : 'इथेनॉल'च्या ट्रोलिंगबाबत नितीन गडकरींनी दिवाणी खटला दाखल करावा

मुंबई उच्च न्यायालय; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित मुंबई :

Archaeology Department on Gopalgad : शिवरायांचा ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होणार; पुरातत्त्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू

२२० रुपयांच्या बोलीवर झाला होता लिलाव https://prahaar.in/2026/07/27/rain-god-blesses-the-kharif-season-what-are-the-dam-water-levels-in-nashik-and-other-divisions/ मुंबई : गुहागर

MPSC Paper Leak : एमपीएससीच्या 'औषध निरीक्षक' भरतीतील पेपरफुटीला नवे वळण; तक्रारदाराचा 'यू-टर्न'

फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव? https://prahaar.in/2026/07/27/paach-futaacha-bachchan-the-story-of-the-five-foot-bachchan-a-kirtankars-daughter-is-coming-your-way-soon-the-poster-was-released-ashadhi-ekadashi/ मुंबई :

Shocking incident in Mumbai : आधी टीबी, मग दमा; चिमुकलीच्या फुप्फुसात ७ वर्षे अडकले होते पेनचे झाकण!

मुंबई: वैद्यकीय क्षेत्रात अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकरण

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या