Eknath Shinde : दिघेसाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, ‘दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?’

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political Parties) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मोठमोठे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचाराकरता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचले. यावेळेस त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. दिघेसाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी सगळ्यात पहिला प्रश्न त्यांच्या प्रॉपर्टीविषयी विचारला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवाय ठाकरे आपल्याला आनंद दिघेंवर सिनेमा काढू देत नव्हते, असंही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे (Anand Dighe) यांचे निधन झाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की, दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? ते ऐकून मला वाटलं की, आपण चुकीच्या जागी आलो. उद्धव ठाकरे मला दिघे साहेबांचा सिनेमाही काढून देत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचा सिनेमा निघाल्यानंतर दिघे साहेबांचा सिनेमा काढला म्हणून वेळ लागला. त्यातही अर्धा सिनेमा पाहून उद्धव ठाकरे निघून गेले. आता पार्ट २ येतोय, आता जे काय खरं खरं आहे ते या सिनेमामध्ये दिसेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही टीकास्त्र डागले. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना ना पैसे द्यायचा, ना वडापाव खाऊ घालायचा. तरीही मी सांगायचो म्हणून सगळे काम करायचे. आता राजनचा सीझन संपला, नरेशचा विजय आता पक्का आहे. पण संजय केळकरांची विनंती आहे की, नरेश तुला थोडं बदलावं लागेल, असे शिंदे यांनी म्हटले. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी चिंता करु नका. मला काही जणांना तिकडे पाठवायचे आहे, काहीजणांना इकडे ठेवायचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांना इशारा

या सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा इशारा आणि काही सूचना दिल्या. २० तारखेपर्यंत कोणीही सुट्टी घेऊ नका. मोदीजींनी एकही सुट्टी घेतली नाही. एकनाथ शिंदेही एकही दिवस सुट्टी घेत नाही. घराघरात जा आणि लोकांना मतदान करायला सांगा. सकाळी सकाळी जाऊन लोकांना भेटा. सुट्टीत गावी जाणाऱ्या लोकांना मतदान करायला सांगा. मतदार बाहेर गेले असतील तर त्यांना इकडे आणण्याची प्रक्रिया आपण करु. नगरसेवकांची ही ट्रायल निवडणूक आहे. काम केलं तर तिकीट नाहीतर मग?, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

5 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

6 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

6 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

6 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

7 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

8 hours ago