डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशातच नवरा-बायकोचं भांडण सोडवणं दोन व्यक्तींना महागात पडल्याच्या दोन धक्कादायक घटना डोंबिवलीतून (Dombivli Crime) समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या दोन व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. या घटनांमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्याची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. काल दुपारी देखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी घरात संदीप यांचा भाऊ सागर होता. सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले. या हल्ल्यात सागर जखमी झाला होता, नंतर त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दरम्यान संगीतानेदेखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. संगीतावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साईटवर ताहियाद अली, सुफीया अली हे दोघे पती-पत्नी मजुरी करतात. या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली हा वाद सोडवण्यासाठी आला. संतापलेल्या ताहियादने जोहर ला लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियाद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…