Mumbai Local : जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी! केवळ तीन महिन्यांत रेल्वे प्रवासात ५६५ जणांचा बळी

  109

प्रवासी संघटनांनी व्यक्त केला संताप


मुंबई : लोकल म्हणजे मुंबईकरांची (Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते. मात्र, याच लोकलचा प्रवास आता जीवघेणा ठरु लागला आहे. बहुतेक जणांच्या कामाच्या वेळा सारख्याच असल्याने दिवसाच्या काही विशिष्ट वेळांमध्ये लोकलला इतकी गर्दी होते की लोक अक्षरशः लटकत, लोंबकळत, धक्काबुक्की करत प्रवास करतात. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे रेल्वे प्रवासात २०२४ मध्ये १ जानेवारीपासून ते ३१ मार्चपर्यंत तब्बल ५६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात सुखकर, स्वस्त आणि आरामदायी प्रवास मुंबईकरांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.


मुंबईमधील वाढती गर्दीही याला कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनानंतर प्रवाशांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र, त्या तुलनेत सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत. रेल्वे प्रशासन केवळ वातानुकूलित लोकल आणण्याच्या मागे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय लोकलच्या फेर्‍या वाढत नसतील तर मुंबई महानगर प्रदेशातील कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल व्हावा, ज्यामुळे एकाच वेळी गर्दी होणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



आंदोलनास परवानगी नाकारली


लोकल गर्दीचे बळी वाढत असल्याने प्रवासी संघटनांनी डोंबिवली येथे शुक्रवारी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वे संघटनांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जीआरपी चर्चा करणार असून, त्यातून तोडगा निघेल, असा विश्वास रेल्वे संघटनांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा

सुरक्षिततेसाठी असणारे बेरिकेट्स ठरताहेत धोकादायक

वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी कांदिवली  : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक

‘तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निणर्य घेणार'

मुंबई : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे

मिठी नदी शेजारील इमारतींची तातडीने दुरुस्ती करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : कुर्ला येथील प्रीमियर कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या मिठी