“लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”

  78

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका


आणंद (गुजरात) : आपण 'लव जिहाद', 'भू जिहाद' याबाबत ऐकले आहे. मात्र, आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी 'व्होट जिहाद' करण्याचे आदेश दिले आहेत. हे लोक मुस्लिमांना एकत्र येऊन भाजपाविरोधात 'व्होट जिहाद' करण्यास सांगत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केला. ते गुजरातच्या आणंद येथील प्रचारसभेत बोलत होते.


पंतप्रधान म्हणाले की, विरोधी आघाडीचा हेतू धोकादायक आहे. मोदी म्हणाले की, सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन मतदान करावे, असे इंडिया आघाडी म्हणत आहे. यासाठी मोदी यांनी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची भाची आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम खान यांच्या भाषणाचा संदर्भ दिला, ज्यात त्या मुस्लिमांना 'व्होट जिहाद'साठी आवाहन करत होत्या. दुर्दैवं म्हणजे व्होट जिहाद करण्याचे आवाहन एका शिकलेल्या मुस्लीम घराण्यातील नेत्याने केले आहे. या घराण्यातील सदस्य काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर आहेत”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.





“जिहाद म्हणजे काय आणि तो कोणाविरोधात केला जातो, हे सर्वांना माहिती आहे. तरीही इंडिया आघाडीचे नेते मुस्लिमांना एकत्र येऊन व्होट जिहाद करण्यास सांगत आहेत. व्होट जिहाद करा, अस सांगत इंडिया आघाडीने लोकशाहीचा अपमान केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याने याचा विरोध केला नाही, व्होट जिहादचे आवाहन करत काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण केलं जात आहे”, असेही ते म्हणाले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे नेते फवाद हुसैन यांनी राहुल गांधी यांचं कौतुक करणारी पोस्ट एक्स या समाजमाध्यमावर केली होती. यावरूनही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. “इकडे काँग्रेस मरत असताना तिकडे पाकिस्तान यांच्यासाठी रडत आहे. पाकिस्तानचे नेते काँग्रेससाठी दुवा करत आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.


आपल्या देशात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात पाकिस्तान मोठा झाला होता. आता पाकिस्तानच्या दहशतवादाचे टायर पंक्चर झाले आहे. एकेकाळी दहशतवाद्यांची निर्यात करणारा देश आता पीठ आयात करण्यासाठी दारोदार फिरत आहे. ज्यांच्या हातात एकेकाळी बॉम्ब होता, त्यांच्या हातात आज भीकेचा कटोरा आहे. काँग्रेसचे कमकुवत सरकार दहशतवादाच्या सूत्रधारांना कागदपत्रे देत असे, पण मोदींचे मजबूत सरकार दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.


यावेळी पंतप्रधानांनी स्वतःला ‘मोहब्बत का दुकान’ म्हणवून घेत काँग्रेसवर खोटे बोलल्याचा आरोप केला. काँग्रेस ‘बनावट’ वस्तूंचा कारखाना आहे. काँग्रेस एवढी संतप्त का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. आज काँग्रेस एक बनावट कारखाना म्हणजेच बनावट मालाची फॅक्टरी बनली आहे. काँग्रेस स्वत:ला मोहब्बत का दुकान म्हणत खोटे का विकत आहे? यूपीए राजवटीला ‘शासनकाळ’ (राज्य) आणि सध्याच्या एनडीएच्या राजवटीचा ‘सेवाकाल’ (सेवा कालावधी) असा उल्लेख करून, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.


आजकाल काँग्रेसचे ‘शहजादे’ संविधान डोक्यावर ठेवून नाचत आहेत, पण ज्या संविधानाची तुम्ही आज कपाळावर हात ठेवून नाचत आहात, ती ७५ वर्षे भारताच्या सर्व भागात का लागू झाली नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान काँग्रेसला केले आहे. काँग्रेसमुळे अनेक दशकांपासून देशाच्या संविधानाशी छेडछाड केली जात आहे. देशाने काँग्रेसची ६० वर्षांची राजवट पाहिली आहे. आता देशाने भाजपची १० वर्षांची सेवाही पाहिली आहे. तीच राजवट होती, हाच सेवेचा काळ आहे, असेही मोदी म्हणाले.


पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवे आहे, जसे २०१४ पूर्वीचे सरकार होते, असे सरकार ज्याच्या अंतर्गत मुंबईत दहशतवादी हल्ले शक्य होते. काँग्रेसला कधीही एससी आणि एसटीची चिंता नाही. तर ९० च्या दशकापूर्वी काँग्रेस ओबीसी आरक्षणाच्या अर्थात बक्षीपंच आरक्षणाच्या बाजूनेही नव्हती. ओबीसी आयोग आणि बक्षीपंच आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा, असे ओबीसी समाज वर्षानुवर्षे सांगत आहे. काँग्रेसने त्यांचे ऐकलं नाही, असेही मोदींनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये